
Tej Police Times
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली गेली आहे. दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते असे म्हणतात. तेव्हा पितृपंधरवड्यात दक्षिण दिशेला चार ज्योतीचा दिवा पंधरा दिवस प्रज्वलती करावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशिर्वाद देतात. तसेच पितृदोष कमी होतो. हा दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिव्यात मोहरीचे तेल वापरायला हवे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानलेली आहे. त्यामुळे मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात तुम्ही जर दक्षिण दिशेला पितृपंधरवड्यात दिवा प्रज्वलीत केला तर पितरांचा आपल्या घराकडे येणारा मार्ग प्रकाशमान होतो. तसेच त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण राहत नाही, ते सहज आपल्या घरी विराजमान होवू शकतात.
पिंपळ वृक्षाचे पूजाविधीमध्ये खूप महत्त्व आहे. पितृपंधरवड्यात दररोज काळे तिळ घातलेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलीत करायला हवा. असे म्हणतात देवीदेवतांसह पितरांचा निवास पिंपळाच्या झाडावर असतो. त्यामुळे पितृपक्षात तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलीत केला तर पूर्वजांचा आशिर्वाद मिळतो. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला भरभराटीचा आशिर्वाद देते.
घराचे प्रवेशद्वार ज्याला आपण मुख्यद्वार म्हणतो तिथे दिवा प्रज्वलीत करून ठेवणे या काळात शुभ मानले जाते. पितृपक्षात जर तुम्ही प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलीत केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासह पूर्वज प्रसन्न होवून तुम्हाला भरभराटीचा आणि सुखसमृद्धीचा आशिर्वाद देतात. याच मुख्यद्वारातून माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते, त्यामुळे घराचा उंबरठा स्वच्छ आणि प्रकाशीत असावा. प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होवून आशिर्वाद देते.
तुमच्या घरी जिथे पुर्वजांची फोटो ठेवलेली आहे किंवा भींतीवर लावलेली आहे त्या जागी दिवा प्रज्वलीत करायला हवा. समजा फोटो फ्रेमखाली दिवा लावायची जागा नसेल किंला तशी व्यवस्था तुम्ही केली नसेल तर दिवा फोटोफ्रेमवरून फिरवून घ्यावा आणि तो दक्षिण दिशेला ठेवावा. हा उपाय केल्यामुळे पूर्वजांची कृपादृष्टी सदैव तुमच्यासोबत राहते आणि घरात अन्नधान्य आणि संपत्तीची भरभराट होते, असे म्हणतात
पितृपक्षाच्या काळात घरातील ईशान्य दिशेला अर्थात उत्तर-पूर्व कोनामध्ये गायीच्या तूपाचा दिवा प्रज्वलीत करायला हवा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होवून तुमची भरभराट करते. त्याचबरोबर संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे तुम्ही जल संचय करता तिथे दिवा लावला असता पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरावर राहते.
हे सर्व उपाय तुम्ही पितृपंधरवड्यात अगदी न चुकता करावेत, यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते. घरातील वातावरण सकारात्मक आणि खेळीमेळीचे राहते.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.