Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुछ पल के अंधेरे का अंत जल्द..; शायरीतून स्नेहलता कोल्हेंची भावनिक साद, निवडणुकीतून माघार?

3

Kopargaon Candicacy Issue Snehlata Kolhe FB Post: महायुतीच्या जागावाटपात कोपरगावची जागा ही अजित पवार गटाला सुटली. त्यामुळे भाजपमधील कोल्हे गटाची राजकीय कोंडी झाली. यावर कोल्हे काही वेगळा निर्णय घेतात का अशी चर्चा असतानाच आता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माघार घेत असल्याची भूमिका फेसबुक पोस्टमधलं मांडली आहे.

Lipi

मोबीन खान कोपरगाव, नगर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागेच्या संदर्भात तिढा निर्माण झाला आहे. परंतु कोपरगावची महायुतीची जागा अजितदादा गटाचे आशुतोष काळे यांना सुटल्याने भाजपात असलेले कोल्हे गटाची राजकीय कोंडी झाली. मात्र, या जागेचा तिढा सोडवण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. बुधवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी फेसबुकवर एक शायरी पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली असून कोल्हे भाजपात राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. वर्षानुवर्षाची पारंपरिक लढत यंदा होणार नसल्याचे चित्र दिसत असून काळे-कोल्हेंच्या ताकतीपुढे महाविकास आघाडीचा उमेदवार कशी टक्कर देणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार तथा विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, निवडणुकीचे बिगुल वाजले बऱ्याच गोष्टी घडल्या. या दरम्यान गेले अनेक दिवस आपण सर्वजण मला, दादांना आणि खास करून विवेकभैय्यांना विविध माध्यमांतून संपर्क करण्याचा प्रयत्न करता आहात. तुम्हा सर्वांना असणारा विश्वास आणि फक्त आपला कोपरगाव मतदारसंघच नव्हे तर अगदी राज्यभरातून अनेक ठिकाणी आपले हितचिंतक आपल्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.
Shivsena First Candidate List: लोकसभेत पराभव तरी विधानसभेत पुन्हा संधी; सर्वात लाडक्या बहिणीला शिंदेंची दिवाळीआधीच भाऊबीज
आम्हाला कल्पना आहे हा काळ सर्वांसाठी अतिशय घालमेल होणारा आहे. तुमच्या भावना आणि कोल्हे कुटुंबाला मिळणारी साथ अविस्मरणीय आहे. स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांपासून जोडलेला आपला ऋणानुबंध हा तीन पिढ्या तितकाच अधिक घट्ट आहे. कार्यकर्ता हा आमच्यासाठी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे मार्गदर्शन,अनेकांचा संघर्ष आणि युवकांच्या अपेक्षा हे सर्व लक्षात घेऊन केवळ निवडणुकी पुरते नाही तर भविष्यातील दूरदृष्टी जपून पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे.

कितीही संघर्ष वाट्याला आला तरी क्षणभर विचार न करता निर्णय घेऊन पुढे जाणाऱ्यातले आपण आहोत. मात्र, सद्या नीटपणे विचार केला तर दहा वर्षे आपण भारतीय जनता पार्टीत निष्ठेने काम करत आहोत, पक्ष वाढीसाठी तुमचे सर्वांचे कष्ट आहेत. अनेकदा आपण जिथे अधिकार असेल तिथे भांडतो. जरी कधी कधी अन्याय झाला असेलही पण तरी आपण पक्षाला मजबूत ठेवण्यासाठी काम करणारे विश्वासू सहकारी आहोत. हीच आपली विश्वासाची वृत्ती आणि निष्ठा संघर्षाला न्याय देणारी ठरेल.

सत्ता ही सेवेसाठी म्हणून बघणे हा आपला पिंड आहे, जरी गेल्या काही काळ मतदारसंघात केवळ कागदोपत्री विकास असेल तरी प्रत्यक्षात खरा विकासाचा धागा विणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेतून सेवेची संधी देण्यासाठी आपली दखल पक्ष सर्वच पातळीवर आज घेतो आहे. राज्यात महायुती असल्यामुळे पक्षाची जागा वाटपात अडचण झाली. यात आपल्याला विजयाची खात्री असतानाही जे काही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेतून सध्या आपण पुढे जाणार आहोत ते त्याहून अधिक सन्मानाचे असेल कारण आपल्या आजवरच्या विश्वासाची ती पावती असणार आहे. आपली वृत्ती कुणाला धोका देऊन पुढे जाण्याची बिलकुल नाही. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी देखील विवेकभैय्यांच्या धाडसी आणि आश्वासक कार्याची दखल घेतली आहे. योग्य ते पावले त्या दृष्टीने पडतील असा विश्वास आहे.

आपण सर्व एक कुटुंब आहोत. तुम्हा सर्वांची साथ इतकी अमाप आहे की कधीच त्यात अंतर येणार नाही. जे ही घडेल आपल्या मतदारसंघाचे अनेक मोठे प्रश्न आहेत स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांचे स्वप्न पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणे हा दूरदर्शी निर्णय बळीराजाचे सोनेरी दिवस आनु शकतो त्या दृष्टीने काम करणे शक्य आहे, शेतकरी कर्जमाफी करून घेणे यासह राज्य आणि केंद्र स्तरावरील अनेक कामे मार्गी लावून मतदारसंघ अधिक सुजलाम सुफलाम करायचा आहे म्हणून विवेकभैय्यांना ऊर्जा देण्यासाठी जे घडेल ते चांगल्या भावनेने घडेल. यावेळी जे काही होईल ते सर्वांच्या हिताचे होईल.

कुछ पल के अंधेरे का अंत जल्द..; शायरीतून स्नेहलता कोल्हेंची भावनिक साद, निवडणुकीतून माघार?

कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असते. तुम्ही सर्व साहेबांनी जोडलेले कार्यकर्तेरुपी कुटुंब आहात त्या शक्तीच्या जोरावर भविष्यात पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकजुटीने पूर्ण ताकतीने लढू आणि जिंकू हा विश्वास ठेवत वाटचाल करूया, असे म्हणत शेर लिहिला आहे. “कुछ पल के अंधेरे का अंत जल्द ही तय हैं, रखिए हौसला अब नजदीक सही समय हैं.!”, असा शेर लिहिल्याने नेमकी कोल्हेंना भाजप कोणती संधी देणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.