तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

शिंदेंआधीच भाजपसोबत गेला असतात, तर मुख्यमंत्री झाला असतात का? अजितदादा हसत म्हणाले…

0 32

बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत भाष्य केले. शरद पवारांच्या कौतुकाबद्दल समाधान व्यक्त करतानाच, पुढची तीस वर्षे नव्या पिढीला संधी देण्याच्या विधानावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. दादा नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : अजित पवार यांची राज्याचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा महाराष्ट्राला माहित आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांसमोर एका कार्यक्रमात अजित दादांनी बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आपली सर्व ताकद लावताना दिसत आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांनी पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधीच तुम्ही भाजपसोबत गेले असते तर मुख्यमंत्री झाला असतात का? यावर अजित पवार यांनी हसत हसत उत्तकर दिलं. दादा नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगोदर जर तुम्ही राष्ट्रवादीतून फुटून बाहेर गेला असता. भाजपसोबत गेले असता तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आमच्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे. आत्याबाईला मिशा असत्या तर? हा जर तरचा सगळा विषय आहे आणि हा विषय आता बोलण्यात काहीच अर्थ नसल्याचं अजित पवार म्हणाले. शरद पवारांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, शरद पवारांनी तुमचे कौतुक केलं. त्यावर अजित पवारांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली की, मला भारी वाटलं.

थोड्याच वेळात पत्रकार दुसरा प्रश्न विचारतो, मात्र शरद पवारांनी सांगितलंय की, मी तीस वर्ष आमदार म्हणून काम केले. त्यानंतर अजित पवारांनी तीस वर्षे काम केले, आता पुढची तीस वर्ष नव्या पिढीला द्यायची आहेत, हे तुम्हाला कसं वाटतं? हा प्रश्न ऐकताच अजित पवार क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, हे मला नाही चांगलं वाटलं. दादांना उत्तर देतान साधलेल्या अचून टायमिंगने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या विषयावर अजित पवारांची महत्वकांक्षा आजही लपून राहिलेली नाही. अनेकदा या विषयावर चर्चा होते, मात्र या संदर्भात अजित पवारांनी नेहमीच प्रश्नाला बगल दिली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट १७ जागांवर आमने-सामने आले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला किती जागांवर गुलाल उधळायची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.