
Tej Police Times
मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईत आला तेव्हा चारही पक्ष त्यांना सामोरे गेले होते. इतकी वर्षे प्रत्येकाची सत्ता येऊन गेली, कोणीच आरक्षण दिलं नाही. मागे सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले होते काय झालं त्याचं? का नाही मिळालं आरक्षण? जरांगे पाटील आरक्षणाला बसले, बोलले निवडणूक लढवू आता बोलतात पाडणार. तुम्हाला लढवायचं तर लढवा नाहीतर पाडा पण प्रश्न एवढाच आहे आरक्षण कसे देणार आहेत हे सांगा. राजकीय पक्ष झुलवत आहेत कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळू शकत नाही. सत्य परिस्थिती मी मांडत आहे, मी हेच जरांगे पाटलांना भेटले त्यावेळी सांगितलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
हा इतका किचकट विषय आहे की, लोकसभेमध्ये कायदा बदलावा लागेल, सुप्रीम कोर्टाकडून आदेश मिळवावा लागेल. एका महाराष्ट्र राज्यापुरता विषय नाहीये, जर हे धोरण घेऊन गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील हे कोणालाही परवडणार नाही. हे होणार नाही प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला माहित आहे. जे जे तुम्हाला सांगत आहेत ना आरक्षण मिळणार आहेत त्यांना एकच विचारा कसं? असा सवालही राज ठाकरेंनी विचारायला लावला आहे.
दरम्यान, मागे मुंबईमध्ये मोर्चे घेऊन आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगतिलं की दिलं आरक्षण, राज्य सरकारला अधिकार तरी आहे का? तामिळनाडूमध्ये राज्य सरकारने असंच एका जातील सांगितलं आरक्षण दिलं पण अजूनही तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे, काहीही निकाल लागलेला नाही. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्यावरून आम्ही एकमेकांना शिव्या घालत आहोत आणि भांडत आहोत. साधुसंतांनी हिच शिकवण दिली आहे का? असं म्हणत ठाकरेंनी निशाणा साधला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.