
Tej Police Times
उदगीर तालुक्यातील एकुरका जवळ टेम्पो आणि कारची धडक झाली आणि भीषण अपघात घडला. या घटनेत चार जणी जागीच ठार झाल्याची चटका लावणारी घटना दुपारी दोन वाजता घडली आहे. मंगलबाई गोविंद जाधव, वय ५५ राहणार एकुरका, प्रतिभा संजय भंडे वय ३० वर्ष राहणार दावणगाव, प्रणिता पांडुरंग बिरादार वय २५ राहणार होणाळी, अनन्या रणजित भंडे वय १४ वर्ष राहणार दावणगाव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. चौघींचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उदगीर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य तीन जखमींवर देखील उपचार सुरू आहेत. तर या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे दावणगाव गावावर शोककळा पसरली आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.