
Tej Police Times
योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेचं फडणवीसांनी समर्थन केलं. ‘समाजाची विभागणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. योगीजी म्हणाले, बटेंगे तो कटेंगे. हा तर भारताचा इतिहास राहिला आहे. भारत जेव्हा जेव्हा जात, प्रांत, भाषांमध्ये विभागला तेव्हा तेव्हा भारत गुलाम बनला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगेमध्ये काहीच गैर नाही. त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला एक है तो सेफ है हा मूलमंत्र जास्त महत्त्वाचा आहे. काँग्रेसकडून समाजाला तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याविरोधात मोदींनी दिलेली घोषणा महत्त्वाची आहे. राज्यातील जनता नक्कीच या घोषणेला साथ देईल,’ असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
Uddhav Thackeray: कोणी बोलायला आल्यास मी तयार! ठाकरेंची भरसभेतून भाजपला साद; म्हणाले, ही तर आपल्यासाठी संधी!
तुमचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अशोक चव्हाण, आमदार पंकजा मुंडे यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा कळली नाहीए का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. ‘अजित पवार, अशोक चव्हाण यांची विचारधारा वेगळी राहिलेली आहे. ते वेगळ्या विचारसरणीच्या पक्षातून आलेले आहेत. अनेकदा मला असं वाटतं की ते ज्या विचारधारेतून आले आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून कधी कधी स्युडो सेक्युलरिजम बाहेर येतं. योगींच्या बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना कळलेला नाही. पण आम्ही त्यांना लवकरच समजवू. मी पंकजा मुंडेंशीदेखील बोललो. तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जिंकत आहोत. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही,’ असं फडणवीस म्हणाले.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.