
Tej Police Times
या प्रकरणामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे हितेंद्र ठाकू बोलले की, भाजपमधीलच एकाने मला तावडे येणार असल्याची बातमी दिली. या एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली. विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या एका वक्तव्याशी हे प्रकरण जोडलं गेलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा वेगळा असू शकतो, असं तावडे म्हणाले होते. याचाच धागा पकडत तावडे यांना अडकवलं गेल्याच्या चर्चांना वेग आला. विनोद तावडे यांना यासंदर्भात विचारण्यात आल्यावर त्यांनी अंतर की बात सांगितली.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र, मुळात पक्षात कोणालाही माहिती नव्हतं की मी तिकडे जाणार आहे. त्यामुळे असा काहीच विषय नसल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. मात्र यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट केले. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला, पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तर महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून विनोद तावडे यांच्यावक पाळत ठेवली गेली आणि तावडे पकडले जातील यासाठी बंदोबस्त केला असल्याचं गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकीआधी प्रत्येक मतदारसंघात १५ ते २० कोटी आचारसिंहतेच्या आधी पोहोचल्याचं राऊत म्हणाले. आता या प्रकरणामुळे भाजपचीही गोची झाल्याचं पाहायला मिळालं.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.