
Tej Police Times
राजेसाहेब देशमुख म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या गुंडांनीच ईव्हीएम मशीन फोडल्या होत्या. सध्या बिहारपेक्षा जास्त गुंडगिरी येथे सुरु आहे. यातच बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मतदान केंद्रावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शन देखील बंद करण्यात आले होते. दरम्यान माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली आणि बुथची तोडफोड देखील धनंजय मुंडेंच्या लोकांनीच केली. पण माझ्या मुलावर आणि पुतण्यावर गुन्हे दाखल केले. लोकशाही मार्गाने मतदान झालेले नाही. यामुळे 22 संवेदनशील अशा मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी देखील राजेसाहेबांनी केली आहे.
परळीत शरद पवारांच्या नेत्याला मारहाण, राजेसाहेब देशमुखांकडून धनंजय मुंडेंचा समाचार, फेर मतदानाचीही केली मागणी
राजेसाहेब पुढे म्हणाले, परळी तालुका आणि शहरामध्ये फेर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, अशातला हा प्रकार आहे. सर्व साम्राज्य त्यांचेच आहे, पोलीस, महसूल, प्रशासन त्यांच्यासोबत आहे. एवढी अराजकता या शहरात कधीच झाली नाही, यामुळे लोक भयभीत झाले आहे. तर ‘सत्तेचा वापर करून सर्व सामान्य लोकांना उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. आमच्या सोबत माणूस आला नाही पाहिजे याची सर्व खबरदारी घेतली गेली होती. बिहार सुद्धा लाजेल, अशी गुंडगिरी सुरु आहे, अशी घणाघाती टीका देखील राजेसाहेबांनी केली.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.