
Tej Police Times
त्यांनी एक फोटो ट्विटकेला, त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही…’. सुषमा अंधारे यांनी ट्विटकेलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांचं जुनं वक्तव्य लिहिलेलं आहे. ‘माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही जण पडणार नाही. तसं झाल्यास मी राजकारण सोडेन’, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून विभक्त झाल्यावर केलं होतं. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.
जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्यासोबत जे आमदार आले आहेत ते पडणार नाहीत, ते पडले तर मी राजकारण सोडेन असं वक्तव्य शिंदेंनी केलं होतं. त्याचीच आठवण सुषमा अंधारे यांनी करुन दिली.
Sushma Andhare: निकाल येण्यापूर्वीच सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, ट्विट करत म्हणाल्या – सहज आठवण…
विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागून आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार की जनता महायुतीला संधी देणार हे स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.