Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sushma Andhare: निकाल येण्यापूर्वीच सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, ट्विट करत म्हणाल्या – सहज आठवण…

19

Sushma Andhare Tweet About Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुषमा अंधारे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

हायलाइट्स:

  • विधानसभा निवडणुकीचा निकाल आज
  • निकालापूर्वीच सुषमा अंधारेंनी शिंदेंना डिवचलं
  • अंधारे यांचं मुख्यमंत्र्यांना बोचणारं ट्विट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणूक निकाल येत्या काहीच तासात स्पष्ट होणार आहे. यावेळी जनतेने महाविकास आघाडीची सत्ता येणार की महायुतीला जनतेचा कौल मिळणार हे काहीच तासात कळणार आहे. दोन्ही आघाड्यांनी आपणच सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, जनतेने कोणाला संधी दिली आहे, हे आता काहीच तासात स्पष्ट होईल. सकाळी ८ वाजता निकाल हाती यायला सुरुवात होईल. निकाल लागण्यापूर्वीच दोन्ही आघाड्यांनी अपक्षांना आपल्या सोबत घेण्यासाठी भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी निकालापूर्वीच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अपक्ष आणि लहान पक्षांना फोनाफोनी सुरु झाली आहे. त्यामुळे निकालानंतर अपक्ष तसेच, छोटे पक्ष कोणाकडे वळतात हे पाहावं लागणार आहे.
Vidarbha Assembly Election Result: सत्ताकौल कुणाला? पूर्व विदर्भात बहिणींची बाजी, पश्चिममध्ये सोयाबीन कुणाला तारणार?
याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. अद्याप निकाल लागयचा आहे, पण त्यापूर्वीच अंधारे यांनी शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक ट्विटकेलं आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत शिंदेंना टोला लगावला.

त्यांनी एक फोटो ट्विटकेला, त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही…’. सुषमा अंधारे यांनी ट्विटकेलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांचं जुनं वक्तव्य लिहिलेलं आहे. ‘माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही जण पडणार नाही. तसं झाल्यास मी राजकारण सोडेन’, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून विभक्त झाल्यावर केलं होतं. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.

जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्यासोबत जे आमदार आले आहेत ते पडणार नाहीत, ते पडले तर मी राजकारण सोडेन असं वक्तव्य शिंदेंनी केलं होतं. त्याचीच आठवण सुषमा अंधारे यांनी करुन दिली.

Sushma Andhare: निकाल येण्यापूर्वीच सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, ट्विट करत म्हणाल्या – सहज आठवण…

विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागून आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार की जनता महायुतीला संधी देणार हे स्पष्ट होणार आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.