
Tej Police Times
शरद पवार यांना लगावला टोला
तर महायुती आणि भाजपला मिळालेल्या यशानंतर उदयनराजे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. मतदारांनी योग्य निर्णय घेतला असून पवारांचा करिष्मा कधीच नव्हता, असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी नेहमीच पायात पाय घालण्याचं काम केलंय, त्याचाच हा परिणाम असल्याचं उदयनराजे म्हणाले. इतकंच नाही तर कर्मा ओल्व्हेज बॅक असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी निवडून येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. उदयनराजेंनी एक दिवस आधी केलेलं हे भाकीत खरं ठरलं आहे. तर राज्यात आता पुन्हा महायुतीचंच सरकार येईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
कर्मा ओल्व्हेज बॅक… छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक दिवस आधीच केलेलं ते भाकीत ठरले तंतोतंत खरं
तब्बल १ लाखांहून अधिक मतांनी विजय
राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे एक आहेत. त्यांचा एक लाख चाळीस हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. तर १९७८ साली अभयसिंह राजे भोसले (शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील) यांनी जनता पक्षाच्या तिकीटावर येथे विजय मिळविला होता.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाची चव चाखावी लागली आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.