
Tej Police Times
केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, ठाणे शहराचा विकास, मुलभूत सुखसोयी आणि नागरी समस्या सुटतील, त्याचबरोबर भविष्यातील खरीखुरी ‘स्मार्टसिटी’ म्हणून नावारुपाला येण्यासाठी, संजय केळकर यांना ठाण्यातून मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे गाडे यांनी या मागणीच्या पत्रात नमूद केले आहे.
पराभव नसून हा विश्वासघात आहे! माजी खासदारांना मंत्रीपदासाठी दबाव तंत्राचा वापर; पाहा काय केले
संजय केळकर संघटनेतील ज्येष्ठ नेते असून त्यांनी निस्वार्थपणे पक्षाची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याचे राजेश गाडे यांनी सांगितले.
संजय केळकर हे उच्चशिक्षित, संयमी आणि अठरापगड जाती-समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत नेतृत्त्व आहे. त्यांनी पक्षात कोणत्याही पदासाठी काम न करता नेहमीच शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यामुळे केळकरांसारखा चेहरा मंञीमंडळात असावा, असे गाडे यांनी सांगितले.
Pune Crime : पुण्यात टोळक्याने महिलेचा कान कापला, दागिने चोरले; परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?
‘निकाल’ लागला, आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी, भाजप आमदाराला मंत्रिपद देण्याची मागणी
ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून १८ पैकी १६ जागांवर युतीचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या बड्या नेत्यांना मंत्रिपदाची स्वप्न पडत आहेत. त्यातच अशा आमदारांची संख्या अर्धा डझन असल्याने महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.