
Tej Police Times
निवडणुकीत अथवा जीवनात मिळालेले यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील, स्थानिक आमदार हे ठरवत नाही, असं प्रत्युत्तर श्रीवर्धन मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे लगावला रोहा येथे माध्यमांशी बोलत होत्या.
कर्जत खालापूर आमदार हे महेंद्र थोरवे काठावर उत्तीर्ण होवून वाचले. ते फार मोठे नसल्याने त्यांना मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा आणि महायुतीच्या माध्यमातून विकास काम करावे. कुठलेही यश मिळाले असले तरी पाय जमिनीवर ठेवून राहावे किंवा मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशाचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.