
Tej Police Times
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 1:55 pm
जिल्ह्यात ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिका आहेत. तर अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आहेत.त्यापैकी नवी मुंबई आणि मीरारोड महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होता. परंतु ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर झाला नाही. त्यामुळे येत्या निवडणूकीत विजय मिळवून ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत, बदलापूर नगरपालिकेत भाजपचा महापौर बसविणे हे उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणूकीत जास्तीजास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आणि महापालिकांवर आपला महापौर बसवण्यासाठी मुख्य भिस्त ही आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर असून आमदार संजय केळकर, गणेश नाईक, किसन कथोरे आणि कुमार आयलानी यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत.
भाजपने आता आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हाअध्यक्षांची एक महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात ५० हजार नवीन सदस्य अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.