Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणुकीत मनसेचा पालापाचोळा; राज ठाकरेंच्या डॅशिंग नेत्याचा राजीनामा; पराभव जिव्हारी

16

Avinash Jadhav: विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यानं होईल, असं भाकित वर्तवणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षाचं पानीपत झालं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे: विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यानं होईल, असं भाकित वर्तवणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षाचं पानीपत झालं. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी एक आमदार निवडून आलेल्या मनसेला यंदा भोपळाही फोडता आला नाही. मनसेच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यात राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचाही समावेश आहे. मनसेची खराब कामगिरी सुरुच असल्यानं त्यांची मान्यता धोक्यात आली आहे. मनसेला त्यांची निशाणी गमवावी लागू शकते. त्यातच आता पराभवानंतर मनसेला ठाण्यात धक्का बसला आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांच्याकडे सोपवली होती. पण दोन्ही जिल्ह्यांमध्ये मनसेचा पराभव झाला. त्यामुळे जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाची राजीनामा दिलेला आहे. पक्षाचं नेतेपद त्यांच्याकडे कायम आहे. ते पद जाधव यांनी सोडलेलं नाही. जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. तो त्यांनी राज ठाकरेंना पाठवला आहे. ठाणे, पालघरमधील पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावं, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
Mohan Bhagwat: तर समाजच नष्ट होईल! भागवतांकडून चिंता व्यक्त; म्हणाले, प्रत्येक दाम्पत्याला किमान…

अविनाश जाधव ठाणे मनसेचा चेहरा समजले जातात. अनेक आंदोलकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बरीच आंदोलनं ते हाती घेत असतात. जनसामान्यांचे प्रश्न ते मांडत असतात. ठाणे शहरमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. भाजपच्या संजय केळकर यांनी जाधव यांचा ५८ हजार २५३ मतांनी धुव्वा उडवला. जाधव थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना ४२ हजार ५९२ मतं मिळाली. तर केळकरांनी १ लाख २० हजार ३७३ मतं घेतली. केळकरांनी या विजयासह आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

डॅशिंग नेते, राज ठाकरेंचे विश्वासू अशी अविनाश जाधव यांचा ओळख आहे. त्यांनी यंदा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षप्रमुख राज ठाकरे हजर होते. राज यांच्या उपस्थितीत जाधव यांनी अर्ज दाखल केला. २०१९ मध्ये जाधव यांनी ठाणे शहरमधून लढताना ७२ हजार ८७४ मतं घेतली होती. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांचा १९ हजार ४२४ मतांनी पराभव झाला होता. पण यंदा ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. याशिवाय त्यांची मतं ३० हजारांनी कमी झाली. त्यामुळे हा पराभव जाधव यांच्या जिव्हारी लागला.
चर्चेत नावं चार, संघाचा स्पष्ट नकार; आम्हाला अजिबात मान्य नाही; RSSचा भाजपला स्पष्ट संदेश
गेल्या निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाले. त्यांच्यामुळे मनसेचं विधानसभेतील अस्तित्व कायम राहिलं. पण यंदा त्यांचाही पराभव झाला. पाटील यांचा मतदारसंघही ठाणे जिल्ह्यात येतो. जिल्ह्याची जबाबदारी अविनाश जाधव यांच्या खांद्यावर होती. पण निवडणुकीत जाधव, पाटील यांच्यासह मनसेच्या सगळ्याच उमेदवारांचा पराभव झाला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.