
Tej Police Times
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
तीन मुलांबाबत सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया, मोहन भागवत अजून…
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा, असं श्रीकांत शिंद म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरे गावात जाऊन काय बसले, शेवटी…’; राजू पाटील यांचे मोठे विधान
दरम्यान, महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं सेना- भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाची मागणी केल्याचीही जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबतही कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.