
Tej Police Times
पुन्हा एकत्र या – महाराष्ट्रासाठी एक साद” शरद पवार साहेब आणि अजित दादांसाठी मौलाना शाहरुख अज़ीज़ खान यांची विनम्र अपील आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच हालचाल जाणवते. काही वर्षांपूर्वी जसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी संवाद साधताना दिसले, तसेच आता सर्वसामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न घर करून बसला आहे – शरद पवार साहेब आणि अजित दादा पुन्हा एकत्र कधी येणार?या दोघांमधील नातं केवळ राजकीय नाही, तर रक्ताचं आहे – चाचा-भाचा. पण जेव्हा ते वेगवेगळ्या वाटांवर गेले, तेव्हा लाखो कार्यकर्त्यांच्या मनात वेदना निर्माण झाली. “जर हे दोघं एकत्र राहिले असते, तर महाराष्ट्रासाठी अजून किती मोठं काही घडू शकलं असतं!” – हा विचार अनेकांच्या मनात आहे.शरद पवार साहेब – वयाच्या नव्वदीकडे जात असूनही आजही सक्रिय. त्यांच्या अनुभवाचं भांडार हे महाराष्ट्रासाठी अमूल्य आहे. दुसरीकडे अजित दादा – झपाट्याने निर्णय घेणारे, कामात कसोशीने झोकून देणारे. या दोघांची एकजूट म्हणजे अनुभव आणि कार्यकुशलतेचं परिपूर्ण मिश्रण. आणि यामुळे महाराष्ट्रासाठी सुवर्णयुगाची वाट मोकळी होऊ शकते.राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नसावं – ते समाज परिवर्तनाचं हत्यार असावं. आणि हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा नेतृत्व हे संवाद, आपुलकी आणि विश्वासाच्या अधारावर उभं राहतं.म्हणूनच माझी एक नम्र विनंती आहे – दोघांनीही आपले वैचारिक मतभेद मागे टाकावेत, एकमेकांचा सन्मान राखावा आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकत्र यावं. महाराष्ट्राला केवळ राजकीय युती नकोय – त्याला कौटुंबिक एकतेतून आलेली ऊर्जा हवी आहे.शरद पवार हे संस्थान आहेत, आणि अजित दादा ही त्या संस्थेची पुढची पिढी. हे दोघं एकत्र आले, तर फक्त राष्ट्रवादी पक्ष नव्हे – सर्व महाराष्ट्र मजबूत होईल.साद एकतेसाठी आहे, विनंती आदराने आहे. कारण आपल्यात भांडणं शोभत नाही – आपण ‘पवार’ आहोत!
मौलाना शाहरुख अज़ीज़ खान सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षक पुणे महाराष्ट्र / अल्पसंख्याक समाज
Recover your password.
A password will be e-mailed to you.