
Tej Police Times
पंचांगानुसार यंदा कार्तिक एकादशी ४ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी पासून तुळशी विवाह सुरू होतात. तुळशीचे लग्न ५ नोव्हेंबरपासून सुरु होतील. ८ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशी विवाह साजरे केले जातील. यंदा ८ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असणार आहे.
विवाहाची वेळ ही गोधूळी ( गाई चरुन घरी येण्याची वेळ ) म्हणजे सायंकाळची असते.
तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात. वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढतात. राधा-दामोदर प्रसनन असें लिहीतात. वृंदावनांतील तुळशींत चिंचा, आवळे ठेवतात. ऊस खोचून ठेवतात. ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे.
वृंदावनाभोवती मांडव घालावा. केळीचे गाभे, आंब्याच्या डहाळ्या, टाळे, फुलांच्या माळा वगैरे लावाव्या. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी घालावी.
हळकुंडे, विड्याची पानें, सुपार्या, खोबर्याच्या वाट्या, हळद-कुंकू, इत्यादि पूजा साहित्य. नारळ, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळे, लाह्या, बत्तासे आदि.
“श्रीमन् महागणपतये नमः असा मंत्र म्हणून तुलसीसहित श्रीगोपालकृष्ण प्रीत्यर्थं विवाहोत्सांगध्यानावहनादि षोडशोपचार पूजनं करिष्ये ” असे म्हणून कळस, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी.
ध्यान करावे व खालील श्र्लोक म्हणावा.
ध्यानाचा श्र्लोक:
शान्ताकारम् भुजगसहयनम् पद्मनाभं सुरेशं ।
विश्र्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैकनाथम् ।
यानंतर गोपालकृष्ण ताम्हनांत घेऊन तुलसी व गोपालकृष्णाची पूजा करावी. यानंतर तुळशीची प्रार्थना करावी. मंगलाष्टके म्हणावी नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षदा टाकून टाळ्या वाजवाव्या. वाद्ये वाजवावी. पूजा करणाऱ्याने एक फुलांची माळ गोपालकृष्णाला व दुसरी फुलांची माळ तुळशीला घालावी. नंतर तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी.
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.