
Tej Police Times
पुणे ग्रामीण,दि.२५:- दौंडमधील हत्याकांड प्रकरण दौंड भीमा नदीच्या पात्रात 7 मृतदेह सापडले असुन
हे 7 ही खून चुलत भावाने केले असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. नेमका यांचा घातपात झाला की, आत्महत्या केली याबद्दल पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेरीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भावानेच हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांच्या मुलासोबत चुलत भावाचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
पण ही बाब मोहन पवार यांनी त्याला सांगितल नाही. 4 दिवसांनी मुलाच्या अपघाताची बातमी मारेकरी चुलत भावाला मिळाली. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून मोहन पवार यांच्यासह कुटुंबीयांची हत्या केली आणि मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिली.
मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) आणि रितेश फुलवरे (७) कृष्णा फुलवरे (४) छोटू फुलवरे (३) अशी मृतांची नाव आहे.
40), श्याम कल्याण पवार (वय 30 ), प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, सासरे मोहन उत्तम पवार आणि संगीता मोहन पवार हे दोघे पति पत्नी असून राणी शाम फुलवरे आणि शाम फुलवरे हे पवार यांची मुलगी आणि जावई असून त्यांना तीन मुले असा एकत्र परिवार अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात राहत होते.
भीमा नदी पात्रात मृतदेह मिळून आले त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. यामध्ये मोहन पवार यांच्या दुसऱ्या मुलाचे एका विवाहित महिले सोबत प्रेम संबंध होते. त्यारागापोटीच घातपात केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सध्या मोहन पवार यांचा मुलगा देखील बेपत्ता आहे त्याचाही शोध घेतला जात आहे.
Like Loading…
Recover your password.
A password will be e-mailed to you.