Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल, जाणून घ्या कारण

19

पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजीच जाहीर होणार आहे.

पुण्यात भाजपकडून गोपनीय सर्वेक्षण; कसबा पोटनिवडणुकीसाठी ३ नेत्यांची लोकप्रियता तपासली, कोण आघाडीवर?

कसबा पेठ मतदारसंघातील भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे अलीकडेच निधन झाले होते. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. परिणामी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीबाबत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले की, चिंचवडच्या जागेवर शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार उतरवण्याच्या विचारात आहे. तर कसबा पेठेतील पोटनिवडणूक कोणी लढवायाची याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापसात चर्चा करुन घ्यावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Pune Bypoll: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक जिंकण्याची जबाबदारी अजित पवारांवर? शरद पवारांचं महत्त्वपूर्ण भाष्य

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा प्रदर्शित केली. आम्ही मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणूक उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूकही बिनविरोध झाली पाहिजे, असे मत एकनाथ शिंदे यांनी म्हटले. परंतु, अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडे ताकदवान उमेदवार नव्हता, त्यांना विजयाची खात्री नव्हती. त्यामुळे भाजपने उमेदवार मागे घेतला होता, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.