
Tej Police Times
हेही वाचा -जेली चॉकलेट बाळाच्या घशात अडकलं, आईनं प्रयत्नांची शर्थ केली, पण जे व्हायला नको तेच घडलं
शिकवणी सोडल्यापासून त्या शिक्षकाच्या वागणुकीतील बदल तिला स्पष्टपणे जाणवत होता. तिला मानसिक त्रास दिला जात असल्याचे तिला कळत होते. त्यामुळे श्रावणी मानसिक तणावाखाली होती. त्यात या कॉपी प्रकरणाने ती आणखीच खचली आणि अखेर त्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तिने सुसाईड नोट लिहून जगाचा निरोप घेतला, असा आरोप श्रावणीच्या आई- वडिलांनी पत्र-परिषदेत केला आहे.
लातूरमध्ये शहरातील किंवा ग्रामीण भागातीलच नव्हे तर राज्यभरातील पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी लातूरला पाठवतात. पण इथे खासगी शिकवणीची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्यातल्या त्यात शिक्षकांनीच खासगी शिकवणी घ्यावी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्याकडे खासगी शिकवणी लावावी असे अप्रत्यक्ष बंधन घालणे गंभीरच आहे. हे एवढ्यावरच न थांबता अशा शिक्षकांकडे खासगी शिकवणी न लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे हे अतिशय भयंकर आहे. या अशा मुल्यहीन व्यवस्थेचा श्रावणी बळी ठरली आहे, असा आरोप श्रावणीच्या पालकांनी केला आहे.
हेही वाचा -लाँग ड्राईव्हसाठी निघाला डॉक्टर, मध्येच थांबला; ४० लाखांची मर्सिडीज पेटवली, कारण…
तसेच, यापुढे अन्य कोणत्या विद्यार्थ्याचा श्रावणी सारखा बळी जाऊ नये यासाठी त्या शिक्षकाला अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या शिक्षकाला अटक झाली नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. आता त्या शिक्षकाला अटक होणार का, शाळा प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.