Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एका ओटीटी अॅपवरील कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सोनालीने या अफवेबद्दल सांगितलं. तुझ्या आयुष्यातली आतापर्यंतची सगळ्यात वाईट अफवा कोणती असं विचारल्यावर सोनाली म्हणाली, ‘माझं लग्न झालंय आणि तेही एका राजकीय नेत्यासोबत. त्याने मला घर दिलंय आणि त्या घरात मी राहते अशा अफवा पसरलेल्या. ही अफवा माझ्या आयुष्यातली वाईट अफवा होती.’ त्यावर शेजारी बसलेला अभिनेता आशय कुलकर्णी म्हणतो, ‘खरंच?’ सोनाली म्हणते, ‘हो. मला माझ्या चुलत बहिणीचा फोन आला आणि ती मला म्हणाली की आम्ही असं ऐकलंय तू लग्न केलंस. मी म्हणाले, माझं लग्न असेल तेव्हा तुला आमंत्रण देईन ना . त्यावर ती म्हणाली की नाही राहून गेलं असेल घाई गडबडीत. मी म्हटलं असं कसं राहील? काहीही काय बोलतेस, मग तिने सांगितलं की नेत्यासोबत लग्न झालंय असं म्हटलं जातंय. त्याने घर दिलंय. मी थोडावेळ स्तब्ध झाले होते.’
सोनालीने यापूर्वी दिलेल्या एका पॉडकास्टमध्येही या गोष्टीचा उल्लेख केला होता. कोल्हापूरमधील एका नेत्यांशी सोनालीचं लग्न झालंय आणि त्याने तिला राहायला घर दिलंय अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्या नेत्याच्या विरोधकांनी त्याला बदनाम करण्यासाठी ही अफवा पसरवली होती. मात्र त्यात सोनालीचं नाव कसं आलं हे आजवर तिला ठाऊक नसल्याचं तिने सांगितलं होतं. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तिने अभिनेता सुशांत शेलार याची मदत घेतली होती.