तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मिट्ट काळोखात कार विहिरीत कोसळली, मदतीला कोणी नाही, पुण्यात तरुणाचा बुडून मृत्यू

0 35

पुणे : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे ओव्हरटेक करताना एका तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. कार विहिरीत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अण्णापूर रस्त्यावर रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.

राहुल गोपीनाथ पठाडे असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओव्हरटेक करताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह गाडीसह बाहेर काढला आहे. एम एच १६ ए टी १६६२ असा गाडीचा नंबर आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल शिरूरहून मलठण गावाकडे आपल्या स्वतःच्या गाडीने जात होता, त्यावेळी रस्त्यावर उसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी रस्ता सोडून १५ फूट लांब असणाऱ्या कठडा नसणाऱ्या विहिरीत जाऊन पडली.

रात्रीची वेळ असल्याने त्याला वाचवायला कोणी आले नसल्याचे समोर आले. गाडीचा वेग खूप जास्त असल्याने गाडी थेट विहिरीत कोसळली. त्यातच त्याचा जागेवर बुडून मृत्यू झाला.

शिरूर तालुक्यात रस्त्यावर अशा अनेक कठडा नसलेल्या विहिरी आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी या विहिरी निदर्शनास येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. या घटनेने पुन्हा एकदा ते समोर आले आहे. हा युवक मूळचा नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रहिवाशी होता. कामानिमित्त तो इकडे आला होता.

हेही वाचा :
मुंबईत पोलिस अधिकाऱ्याच्या बायकोचा पाठलाग, घरात घुसून टी-शर्टही फाडला
घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरीकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. वेळेत मदत मिळाली नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :
बाबा कुठे गेले? शोधत लेक पेट्रोल पंपाजवळ पोहोचली, झाडाकडे बघून हंबरडा फोडला… ए आईsss

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.