Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात दिवसभर वाट चुकलेल्या एका हत्तीने चांगलाच धुमाकूळ घातला. यामुळे अनेक गावातील ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. दिवसभर फिरून दुपारनंतर हत्ती हिरण्यकेशी नदीतून जंगलात गेला आणि सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. (when elephant that come from forest enters into village in kolhapur)
काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरात गडहिंग्लज तालुक्यातील पश्चिम भागातील एक हत्ती पूर्व भागात आला. या भागात दोन हत्तींचे वास्तव्य आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर हे दोन्ही हत्ती वाट चुकल्याने एक पूर्व भागात तर दुसरा पश्चिम भागात गेला. सकाळी त्यातील एक हत्ती आजरा चंदगड रोडवरील अनेक गावात घुसल्याने एकच गोंधळ उडाला.
क्लिक करा आणि वाचा- धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल्स कधी सुरू होणार?; मुख्यमंत्री म्हणाले…
प्रथम हत्ती भादवणवाडी, खोराटवाडी या गावाच्या हद्दीत घुसला. त्यानंतर त्याने खेड या गावातूनच रपेट मारली. हत्ती पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी आणि त्यांना हुसकावण्यासाठी वन विभागाची धडपड यामुळे पुढे हत्ती आणि मागे ग्रामस्थ अशी अवस्था बराच वेळ सुरू सुरू होती. यामुळे हत्ती इकडेतिकडे पळू लागल्याने बऱ्याच ठिकाणी भात व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री Live: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…
या हत्तीने हाजगोळी, मुंगुरवाडी, मडिलगे शिरसंगी अशा अनेक गावात फिरत धुमाकूळ घातला. यामुळे भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी फौज तैनात करून त्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्याचे दिवसभर प्रयत्न सुरू होते. सायंकाळी त्या प्रयत्नाला यश आले आणि हिरण्यकेशी नदी पार करून हत्ती जंगलात जाताच सर्व ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला.
क्लिक करा आणि वाचा- पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता, हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड भागात सात हत्तींचे गेले अनेक वर्षे वास्तव्य आहे. या हत्तीकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांना कर्नाटकातील जंगलात सोडण्याचे प्रयत्न गेली काही वर्षे सुरू आहेत. मात्र दर वर्षी ते हत्ती पुन्हा पुन्हा येत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.