
Tej Police Times
राज्यातील पूरबाधितांना तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र घोषणेनंतर २० दिवस उलटले तरीही पूरग्रस्तांना मदत मिळाली नव्हती. यामुळे सांगली, कोल्हापूरसह कोकणातील पूरबाधितांमधून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी उमटत होती. अखेर राज्य सरकारने त्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक
पूरग्रस्तांना कशी मिळणार मदत?
पहिल्या टप्प्यात ज्या घरांमध्ये पुराचे पाणी गेले होते अशा कुटुंबांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी १० हजार रुपये दिले जात आहेत. शिराळा तालुक्यातील ७३६ पूरबाधित कुटुंबांच्या बॅंक खात्यांवर ७३ लाख ६० हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील अपर आष्टा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पूरबाधित कुटुंबांना ४ कोटी ८३ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली. ही रक्कम दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितलं आहे.
चिंतेत वाढ; राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढली; मात्र ‘हा’ दिलासाही!
‘पलूस तालुका, सांगली ग्रामीण, मिरज तहसील ग्रामीण क्षेत्रासह सांगली मिरज महापालिका क्षेत्रामध्ये अनुक्रमे ४ कोटी ७९ लाख १० हजार, ३ कोटी ११ लाख, ५३ लाख ३० हजार ९ कोटी ७३ लाख एवढे अनुदान येत्या दोन ते तीन दिवसांत बॅंकेमध्ये जमा होत असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण २२ हजार ९९४ पूरबाधित कुटुंबांच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा होणार आहे. याचबरोबर उर्वरीत बाधित कुटुंबांना अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत शासनाकडे अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.