
Tej Police Times
डॉ. प्रभाकर मांडे आणि मी कॉलेजपासून सहाध्यायी होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते उशिरा आले. त्यांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे लोकसाहित्याचे सिद्धांत मराठीत मांडले आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या जीवन पद्धतीचे संशोधन केले. काही भटक्या जातींच्या स्वतंत्र भाषांची उकल केली. हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. मध्ययुगीन संत साहित्याच्या दुर्मीळ पोथ्या गोळा करुन त्यानी मौलिक ग्रंथशाळा उभारली होती.
डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक
लोकसाहित्य संशोधनाला व्यापक करण्यासाठी त्यांनी ‘लोकसाहित्य परिषद’ स्थापन करुन समकालीन संशोधकांसह चळवळ राबविली. लोकसंस्कृतीवर चिकित्सक लिखाण करीत व्याख्यानेही दिली होती. उपासनाप्रधान व रंजनप्रधान लोकगायकी परंपरेची विस्तृत मांडणी केली. त्यामुळे मराठवाड्यातील लोकपरंपरा पहिल्यांदाच अभ्यासल्या गेल्या. २००७ मध्ये झालेल्या उंडणगाव येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे मांडे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. लोकसाहित्यातील संशोधनासाठी केंद्र सरकारने डॉ. प्रभाकर मांडे यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. मागील काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथून ते अहमदनगर येथे वास्तव्यास गेले होते.
मराठा नेते आल्यास ट्रॅक्टर देऊ नका,नांदेड पोलिसांच्या शेतकऱ्यांना नोटिसा, माहिती मिळताच मनोज जरांगे संतापले
डॉ. ना. गो. नांदापूरकर यांच्यानंतरचे लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि जातसंस्कृतीचा सखोल अभ्यास करणारे संशोधक अशी डॉ. प्रभाकर मांडे यांची ओळख होती. त्यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासाला चालना दिली. या कामाला देशभरात मान्यता होती. त्यांच्या जाण्याने लोकसाहित्याची हानी झाली आहे.
कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन ओबीसी आंदोलकांच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
डॉ. प्रभाकर मांडे यांचे ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकरंगभूमी : परंपरा, स्वरूप आणि भवितव्य’, ‘एक होता राजा’ (लोककथा), ‘लोकरंगभूमी’, ‘लोकसाहित्याचे अंत:प्रवाह’, ‘गावगाड्याबाहेर’, ‘लोकनायकांची परंपरा’, ‘लोकरंगधारा’, ‘लोकपरंपरेतील खेळ’, ‘मांग आणि त्यांचे मागते’, ‘लोकपरंपरेतील शहाणपण’, ‘उपेक्षित पर्व’, ‘आदिवासी मूलत: हिंदूच’, ‘बिल्वदल’, ‘दलित साहित्याचे निराळेपण’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट् पदवीने सन्मानित केले होते.
जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सैन्यदलाचे तीन जवान शहीद, तीन जखमी, चकमक सुरु
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.