Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राजू शेट्टींची भाजपशी सलगी आणि आघाडीवर टीका; जयंत पाटील म्हणाले…

18

हायलाइट्स:

  • राजू शेट्टी भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा
  • जयंत पाटील यांचा राजू शेट्टींना सबुरीचा इशारा
  • राजू शेट्टींनी हवेत आरोप करू नयेत – जयंत पाटील

सांगली: पूरग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीत विलंब होत असल्याने राज्य सरकारच्या विरोधात मोर्चे काढणारे माजी खासदार राजू शेट्टी यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सबुरीचा सल्ला दिला. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. राजू शेट्टी यांनी हवेत आरोप करणे योग्य नाही. त्यांनी चुकीचे आरोप करणे टाळावे, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी शेट्टींना दिला. ते शुक्रवारी आष्टा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वाचा: राणेंच्या घरासमोर राडा करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं युवा सेनेत मोठं प्रमोशन

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरानंतर अजूनही पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात मोर्चे काढत आहेत. मोर्चातील सभांमधून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असूनही शेट्टींनी सरकारच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेट्टींनी इस्लामपूर येथील मोर्चात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करीत गंभीर आरोप केले होते. जयंत पाटील यांनी मांडलेल्या पूर संरक्षक भिंत आणि बोगद्याद्वारे पंचगंगा नदीचे पाणी वळवण्याच्या कल्पनेवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. याशिवाय त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठक घेऊन एकत्रित मोर्चे काढणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे शेट्टींची भाजपसोबत सलगी वाढत चालल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

वाचा: शिवसेनेनंतर आता भाजपचाही शुद्धीकरण विधी; पाहा, नेमकं काय घडलं?

यावर अखेर मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. योग्य पद्धतीने मदत देण्याचे काम सुरू आहे. राजू शेट्टींनी हवेत आरोप करू नयेत. सांगलीतील पूर संरक्षक भिंत आणि पंचगंगेचे पाणी बोगद्याद्वारे राजापूर बंधाऱ्यापुढे सोडण्याच्या कल्पनेवर शेट्टींनी आक्षेपार्ह विधान केले. लोकांच्या हितासाठी ही कल्पना पुढे आली आहे. यावर अजून विचारविनिमय सुरू आहे. राजू शेट्टींचा विरोध असेल तर हे काम थांबवू. पण पुरामुळे शिरोळ तालुक्यासह इचलकरंजीतील होणारे नुकसान कसे टाळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेट्टींनी मोर्चात काहीही बोलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. पाटील यांनी दिलेल्या या सबुरीच्या सल्ल्यानंतर आता माजी खासदार शेट्टी पुन्हा महाविकास आघाडीसोबत जमवून घेणार, की महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन भाजपशी सलगी करणार, हे पहावे लागणार आहे.

वाचा: आघाडीपुढं नवा पेच? शिवसेना आमदाराविरोधात काँग्रेसचा माजी मंत्री कोर्टात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.