
Tej Police Times
पुण्यातील चितळेंची बाकरवडी आता मुंबईत ही मिळणार
चितळेंच्या फॅक्टरीमध्ये तयार होणारा पदार्थ आधी घरी येतो, त्यावर टीका, टीप्पणी होते, कौतुक होते, त्यानुसार त्यात बदल होतात आणि मग तो पदार्थ विक्रीयोग्य करून दुकानात जातो असे चितळे बंधूंतर्फे सांगण्यात आले. भिलवडीला चितळेंच्या डेअरीचा सुरू झालेला प्रवास सांगताना साताऱ्यात दूध विकण्याची पद्धत नव्हती मात्र आजोबा भास्कर गणेश चितळे यांनी ही पद्धत सुरू केली याचीही आठवण त्यांनी जागवली. त्यानंतर कृष्णाकाठी सुयोग्य जागा पाहून डेअरीचा भिलवडीला सुरू झालेला व्यवसाय, पुण्यात आगमन, विपणन, पदार्थ वाढल्यावर यांत्रिकीकरणावर दिलेला भर, ९० च्या दशकापासून बाकरवडी यांत्रिक पद्धतीने बनवण्यासाठी केलेले संशोधन असा व्यापक पट या दीड तासांच्या गप्पांमध्ये मांडण्यात आला.
‘चितळे’ दुपारीही सुरू…
पारंपरिक पदार्थांची चव राखण्यासाठी काय दक्षता घेतली जाते याबद्दही यावेळी सांगण्यात आले. खवा बननण्याचे पहिले मशिन चितळेंकडे होते. एकाच पद्धतीने खवा बनवून मग तो खवा पुण्यात आणून त्याची आंबा बर्फी होते. पूर्वी चितळेंकडे दिवसाला २०० किलो बाकरवडी बनवली जायची मात्र आता प्रति तास २०० किलो बाकरवडी केली जाते ते यांत्रिकीकरणामुळे शक्य झाल्याचेही चितळे यांनी सांगितले. काही पारंपरिक पदार्थांना भावनिक स्पर्श हवा त्यामुळे ते पदार्थ मात्र यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून करणे टाळतो याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
आमची अन्यत्र शाखा नाही, दुपारी १ ते ४ बंद, चितळेंच्या मिठाईचे दर ते सोशल मीडियावर चितळे बंधूंच्या दुकानाबद्दल येणारे मीम्स अशा विविध विषयांवर गाडगीळ यांनी चितळेंना प्रश्न विचारले आणि त्यांनीही तितक्याच खुलेपणाने याची उत्तरे दिली. यावेळी गिरीश चितळे यांनी मराठी उद्योजकांनी ब्रॅण्ड आयडेंटिटीचा तिटकारा सोडला पाहिजे असे आवर्जून सांगितले. चितळेंनी फ्रँचाइजी सुरू केल्यानंतर स्थानिक ग्राहकवर्गाने त्याला पाठिंबा दिला असेही निरीक्षण त्यांनी मांडले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.