Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

प्रेमी युगुलाचं पळून जाऊन लग्न, १५ दिवसांनी घरी येताच दोन्ही कुटुंबात लाठ्या-काठ्या भिडल्या अन् मग…

8

छत्रपती संभाजीनगर: पदमपुऱ्यातील मोची गल्ली शेजारी राहणाऱ्या मुला मुलीने पळून जाऊन आर्य समाजात मंदिरात लग्न केलं. पंधरा दिवस बाहेर राहून ते घरी परतले. नंतर दोघेही घरी परतले, यावेळी दोन्ही कुटुंबातील १८ जण एकमेकांवर तुटून पडले. यामध्ये काठ्याचाकू दांडे याने एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वेदांत नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर शहरातील पदमपुरा भागात असलेल्या मोची गल्लीमध्ये राहणाऱ्या मेहरा आणि बरथूने कुटंबीय राहतात. या दोन्ही कुटुंबाती मुलगा आणि मुलीचे काही वर्षांपासून प्रेम संबंध जुळून आले. यामध्ये त्यांच्या जवळीक वाढली. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र, दोघांच्या कुटुंबांमधून विरोध झाला. यामुळे दोघांनी पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केल.

लग्न केल्यानंतर ते दोघे पंधरा दिवस बाहेरगावीच राहिले. त्यानंतर घरची परिस्थिती निवळली असेल असे समजून दोघेही घरी परतले. यावेळी दोघांच्या घरातील कुटुंबियांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही कुटुंब एकमेकांवर तुटून पडले. यामध्ये दोन्ही कुटुंबांनी लाठ्या काठ्या आणि चाकूने एकमेकांवर वार केले. यामध्ये १८ ते २ जणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या प्रकरणी वेदांत नगर पोलिस ठाण्यात भारत, तुषार,जयेश, सुंदर, राजेश, गणेश मेहरा यांच्यावर तर शारदा मेहरा यांच्या तक्रारीवरून संतोष,रतन, नरेंद्र, प्रकाश, दिनेश,सुमित सर्व बरथूने यांच्यासह महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोलीबाहेर जेवणाचा डबा, लाइट-पंखा सुरुच, पण आतून कोणी प्रतिसाद देईना, खिडकीतून आत पाहताच…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.