Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पाणबुडी प्रकल्प गुजरातला? सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, मुख्यमंत्री म्हणाले….

6

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला जात असल्याने आधीच वातावरण तापलेले असताना, आता राज्यातला पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गातून गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगला आहे. या आरोपावरून रविवारी दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

‘त्यांनी गुजरातला सोन्याने मढवून द्वारका करावी,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले, तर ‘हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे,’ असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्रातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प हा सिंधुदुर्ग येथे होणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी केला. नाईकांच्या या आरोपानंतर शनिवारी सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला रविवारीदेखील कायम राहिला. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. याबाबत राऊत म्हणाले, की, आतापर्यंत महाराष्ट्रातून १७ महत्त्वाचे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले. गेल्या दीड वर्षांत गुजरातमध्ये वेगवेगळे महत्त्वाचे प्रकल्प खेचून नेले. मुंबईतील उद्योजकांमध्ये दहशत पसरवून त्यांना घेऊन जातायत. मी म्हणतो, त्यांनी गुजरातला सोन्याने मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणे नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात. असे कुणीच कधी बोलले नसल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. नारायण राणे यांनी हिम्मत दाखवावी आणि महाराष्ट्रातील एकही उद्योग राज्याच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे स्पष्ट सांगावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

दुर्दैवी! थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की तयारी राज्याने करायची आणि प्रकल्प गुजरातने न्यायचे आणि जे लोक आहेत, राणे, सामंत, केसरकर यांना फक्त आमच्यावर टीका करण्याचे काम आहे. यांच्या बुडाखालचा पाणबुडी प्रकल्प गेला हे आपल्या दृष्टीने हितावह नाही. रिफायनरी नाही न्यायची, फक्त ज्यातून फायदा ते नेतात. हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहील. कारण गुजरातच्या लोकांसमोर आपल्या नेत्यांची तोंडे उघडत नाहीत. तिथे केंद्रातील सूक्ष्म मंत्री आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आहेत तरी इतका चांगला प्रकल्प गेला असल्याची टीका केली.

‘खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका’

‘खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे. तो राज्यातून बाहेर जाणार नाही,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी जाहीर केले. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनीही याचा पुनरुच्चार केला. पाणबुडीचा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही. प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रात अनेक उद्योजक इकडे येण्यासाठी इच्छुक असतात. त्यासाठी या सरकारने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पाणबुडी प्रकल्प जाणार नाही : राणे

चिपळूण : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जनतेला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी, आमच्या महायुती सरकारवर विरोधक टीका करण्याचे काम करीत आहेत. हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच होणार आणि आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

हे सरकारच रेव्ह पार्टीतून निर्माण झालं आहे; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस-पवार सरकारला डिवचलं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.