
Tej Police Times
ईव्हीएमच्या मुद्यावरुन उद्या जनता रस्त्यावर उतरली आणि अराजक माजले तर त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील त्यांनी दिला. मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास भाजपला नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणूक देखील जिंकता येणार नाही असे राऊत म्हणाले.
जागा वाटपाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर देखील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कुणीही भाजपला मागच्या दाराने मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही असे सूचक विधान देखील त्यांनी केले.
‘दहा दिवसात राज्यात भूकंप होणार’ असे विधान भाजपच्या एका मंत्र्याने केले आहे, या बद्दल राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत जनताच भूकंप घडवून भाजपला घरी बसवेल. ईडी, सीबीआयचा वापर करुन धाडी टाकणे याला भूकंप म्हणत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.