
Tej Police Times
एकेकाळी कणकवली शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सुनीलने आज स्वतःच्या २२ गुंठे बागेमध्येच एका कोपऱ्यात छोटसं दोन खोल्यांचं चिरेबंदी घर बांधले आहे. या घरामध्ये तो त्याच्या कुटुंबासह राहत आहे. उजाड माळरान असलेल्या या जागेमध्ये सुनीलने आंबा, काजू आदी झाडांची लागवड केली आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सुनीलने स्वतः कुटुंबीयांसह कष्ट घेत या जागेत विहीर देखील बांधली आहे. त्या विहिरीचे पाणी तो बागायतीसाठी पाईपलाईन द्वारे पुरवतो. त्याचबरोबर त्याने शेळी पालन देखील सुरू केले आहे. भूमी नसल्याने जमीन नावावर करण्यासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागला होता. मात्र यावर देखील त्याने मात करत या जागेचा सातबारा आता स्वतःच्या नावे मिळवला आहे.
रेसकोर्सचा प्रश्न, रखडलेली उद्धाटन; शिवसैनिकांसमोर आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं
सुनीलला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण त्याने सुरू ठेवले आहे. मात्र बागायतीसाठी आणि घरासाठी अद्याप वीज पुरवठा झाल्या नसल्याची खंत तो व्यक्त करतो आहे. आम्ही अशिक्षित आणि अडाणी राहिलो यामुळे दुसऱ्यांच्या बागा आणि शेतामध्येच राबत राहिलो होतो. पण आमची पुढची पिढी मात्र सुशिक्षित, सरकारी नोकरदार, व्यावसायिक किंवा बागायतदार बनावी, असे स्वप्न सुनील पाहत आहे. सुनीलचा हा जीवनप्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.