
Tej Police Times
कक्षाचे प्रमुख आरती जाधव आणि पथकाच्या सदस्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने पती-पत्नी व संबंधितांना वेळोवेळी बोलवून घेऊन त्यांचे समुपदेशन केले. ‘पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे ८८ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले. मात्र, तडजोडीत ज्यांचे जमले नाही त्यांनी अखेर कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. काही प्रकरणे पोलिस ठाण्यात वर्ग केली जातात. यात ६८ प्रकरणे कक्षस्तरावर प्रलंबित असून, १६६ प्रकरणे पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहेत. कोर्टात धाव घेणे; तसेच वारंवार सूचना देऊनही कक्षात हजर न राहिल्यामुळे ७२ प्रकरणांची फाइल बंद झाली आहेत,’ अशी माहिती कक्षप्रमुख जाधव यांनी मटाशी बोलताना दिली.
‘आलेल्या तक्रारीचा अभ्यास केला जातो. छोट्या किंवा किरकोळ कारणांमुळे कुटुंब मोडू नये; तसेच कोणावरही अन्याय होता कामा नये, या दृष्टीने प्रयत्न केले जातात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून मार्ग काढला जातो. समुपदेशन केले जाते,’ असेही त्यांनी नमूद केले.
तहसीलदारांच्या कक्षात विषप्राशन; पूरप्रश्नाकडे दुर्लक्षावर यवतमाळच्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल
पीडित पुरुषांनीही घेतली मदत
या सहायता कक्षात तक्रार दाखल करण्याऱ्यांमध्ये पीडित महिलांची संख्या जास्त असली, तरी गेल्या काही वर्षांत पत्नी, सासुरवाडीच्या लोकांमुळे छळ होत असल्याचे गाऱ्हाणे घेऊन पुरुषही या कक्षाकडे धाव घेत आहेत. गेल्या काही महिन्यांत १२ पुरुषांनी मदतीसाठी सहायता कक्षाकडे धाव घेतली आहे.
प्रमुख तक्रारी –
कौटुंबिक कलहाच्या प्रकरणात प्रामुख्याने पैशांसाठी त्रास, पतीचे दारूचे व्यसन, पती घरात पैसे देते नाही, मोबाइलचा अतिवापर त्यावरून होणारे वाद, पैशांची चणचण, एकत्रित कुटुंब नको, सासुरवाडीच्या लोकांचा संसारातील छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष घालतात, घरातील लोकांनी अपमानास्पद वागणूक देणे, सन्मान न करणे, पत्नी नेहमी माहेरी जाते, पत्नीला नांदण्यास तयार नाही किंवा येत नाही, संशय घेणे आदी स्वरूपाच्या तक्रारी प्रामुख्याने कक्षाकडे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.