Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निकालापूर्वी राहुल नार्वेकर घरी येऊन का भेटले? एकनाथ शिंदेंनी कारण सांगत ठाकरेंना सुनावलं

6

मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मला रात्रीच्या अंधारात लपुनछपून भेटायला आले नव्हते. ते दिवसाच्या उजेडात त्यांच्या अधिकृत वाहनाने वर्षा बंगल्यावर आले होते. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासकामासंदर्भात चर्चा झाली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल बुधवारी दुपारी दिला जाणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या भेटीवर टीका करत आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी दुपारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विधानसभा अध्यक्ष दुपारी चार वाजता आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देणार आहेत. त्यानंतरच मी आमची भूमिका मांडेन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांसोबतच्या भेटीचे समर्थन केले. काही लोक आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचा आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते. तेव्हा आम्ही आक्षेप घेतला का? विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या अधिकृत वाहनातून मला भेटायला आले होते. ते रात्रीच्या अंधारात लपूनछपून नव्हे तर दिवसाउजेडी आले होते. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासंदर्भात ही भेट होती. ही भेट झाली तेव्हा सरकारी अधिकारीही सोबत होते. आमच्यात लपूनछपून कोणतीही बैठक झाली नाही. आम्ही अंधारात बैठका घेणाऱ्यातील नाही. त्यामुळे या भेटीवरुन आरोप करणाऱ्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. जेव्हा एखादा निकाल यांच्या बाजूने लागतो, तेव्हा ती संस्था चांगली ठरते. निकाल विरोधात गेल्यास संबंधित संस्थेवर टीका केली जाते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

मेरिटच्याआधारे विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे: एकनाथ शिंदे

केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. आम्हाला आयोगाने धनुष्यबाण हे चिन्हही दिले आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आहे. या बहुमतच्या आधारेच निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आम्ही अधिकृत पक्ष आहोत, धनुष्यबाण हे चिन्हही आमच्याकडे आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी आमच्याच बाजूने निकाल दिला पाहिजे. आमचं सरकार हे घटनाबाह्य नाही तर ठाकरे गट हा घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांनी बारकाईने वाचला पाहिजे. त्यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार अस्तित्त्वात नव्हते. त्यामुळे राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय योग्य होता. त्यावेळी आमच्याकडे ५० आमदार आणि भाजपचे ११० आमदार असे बहुमत होते. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

कही खुशी, कही गम! आमदार अपात्रतेच्या निर्णयापूर्वी सूचक बोलले निकम; कोणाचा ‘निकाल’ लागणार?

ठाकरे गटाला त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते पडणार असे वारंवार सांगितले जात आहे. मुख्यमंत्री बदलणार अशीही चर्चा होती. पण उलट सरकार आणखी मजबूत झाले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. विधानसभा अध्यक्ष आणि माझ्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. पण मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा करतो, हेच दुर्दैव आहे. मला आरोप बोलायला हे काही फौजदारी प्रकरण आहे का? हे नागरी प्रकरण आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Shiv Sena MLA Disqualification : ठाकरेंचे आरोप, नार्वेकरांनी सांगितलं शिंदेंसोबतच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.