
Tej Police Times
प्रवाह रोखणारे अतिक्रमण हटवा
उगमस्थान ते संगमापर्यंत या नद्यांच्या पात्रांचा महसूल विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार आराखडा तयार करणे आवश्यक आहे. नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढावीत, तसेच नदीप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नद्यांच्या पात्रात नवीन बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. अभियानांतर्गत नदीचा आराखडा तयार केल्यानंतर नोडल अधिकारी व नदीप्रहरी यांच्या नियमित बैठकी जिल्हाधिकारी यांनी घेऊन प्रगतीचा आढावा घ्यावा, अशी सूचना राजेंद्र सिंह यांनी केली.
अस्पर्शित लक्षद्वीप पर्यटकांच्या लोंढ्यासाठी लक्षद्वीप सज्ज आहे का? कसे पोहोचावे? कुठे भेट द्यावी, किती खर्च
या नद्यांचा समावेश
नागपूर : नाग नदी (५६ किलोमीटर), साधुखोरा (आंब) (२५.५ किलोमीटर)
गोंदिया : चूलबंद नदी (२८ किमी)
चंद्रपूर : उमा नदी (१३० किमी), इरई नदी (१०४ किमी)
गडचिरोली : खोब्रागडी नदी (८१ किमी), कठाणी नदी (७० किमी), पोहरा/ पोपखोडी नदी (५४ किमी)
वर्धा : धाम नदी (८६ किमी), वेना नदी (८६ किमी), यशोधा नदी (४४५ किमी)
भंडारा : चूलबंद व वैनगंगा नदी
या सूचनांचे पालन करा
-नदी साक्षरता वाढविण्यासोबतच नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येत आहे.
-जिल्हाधिकारी यांनी नोडल अधिकारी तसेच नदी प्रहरी यांच्या माध्यमातून नदी प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना सूचवायच्या आहेत.
-पावासाळ्यापूर्वी या अभियांनांतर्गत निवडण्यात आलेली कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
-शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण, गावातील सांडपणी व घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर उपाययोजना कराव्यात तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने नदी स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशा सूचना राजेंद्र सिंह यांनी केल्या.
Recover your password.
A password will be e-mailed to you.