
Tej Police Times
चौहान यांनी छात्र संसदेच्या तरुणांशी संवाद साधताना मध्य प्रदेशातील राजकारणावर प्रकाश टाकला. ‘मध्य प्रदेशातील महिलांना पुरुषांच्या समान वागणूक द्यायला सुरुवात केल्याने त्या राज्यात मोठे बदल घडले. महिलांसाठीच्या योजनांमुळे राज्यातील पुरुष-महिला प्रमाणातही समतोल साधला जाऊ लागला. महिलांच्या खात्यात पैसे जात असल्याने त्यांचा वैयक्तिक विकास होऊन पुरुषांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले. ‘लाडली बेटी’ योजनेतील लहान लहान मुली आज उच्च शिक्षण घेताना पाहतो, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो,’ असे चौहान यांनी सांगितले. या प्रयत्नांमुळेच निवडणुकीच्या सगळ्या विश्लेषकांना चूक ठरवून मी मध्य प्रदेशची सत्ता आणली,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राचा डंका, महाराष्ट्र ठरले देशातील सर्वात स्वच्छ राज्य
‘तरुणांनो, राजकारणात या’
चौहान म्हणाले, ‘तरुण मुलांनी राजकारण आपले क्षेत्र नाही, असे समजू नये. अजून किती दिवस तुम्ही चोरी करणाऱ्यांच्या, धनाढ्यांच्या, पैसे खाणाऱ्यांच्या हातात राजकारण देणार आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकारणातून पैसा घालवायचा असेल तर सुशिक्षितांना राजकारणात यावेच लागेल. त्यामुळे तरुणांनो राजकारणात येण्यासाठी मागेपुढे पाहू नका.’
मोफत शिक्षणासाठी प्रयत्न करणार
‘देशातील प्रत्येक मुलाचा शिक्षण हा अधिकार आहे. आणि त्याला ते मोफतच मिळाले पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणूनच देशभरातल्या मुलांना सर्वप्रकारचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी आता मी प्रयत्न करणार आहे,’ असे चौहान यांनी स्पष्ट केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.