
Tej Police Times
राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचे संकेत दिले. परंतु, पत्नी आणि मुलावर दाखल करण्यात आलेला गुन्हा त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत होते. एसीबीची धाड पडल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मोबाईलवर फोन केल्याचेही राजन साळवी यांनी सांगितले. माझ्या घरावर धाड पडल्याची माहिती समजली तेव्हा उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझी विचारपूस केली. राजन, संपूर्ण शिवसेना आणि महाराष्ट्र तुझ्या पाठिशी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितल्याचे राजन साळवी यांनी म्हटले.
एसीबी माझ्या घरावर धाड टाकणार, याची कुणकुण मला आधीच लागली होती, असे राजन साळवी यांनी म्हटले. रत्नागिरीत ज्याप्रकारे एसीबीची पावलं पडत होती, त्यावरुन मला अंदाज आला होता. एसीबीच्या पथकातील अधिकारी रत्नागिरीतील अल्फा हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती जिल्ह्यातील लोकांकडून मला मिळाली. त्यामुळे आज सकाळी एसीबीचे अधिकारी घरी येतील, याचा अंदाज मला होता. मी शिंदे गटात प्रवेश केला नाही म्हणून माझ्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दबाव आणण्याचा प्रकार आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले.
ही तर ठाकरी भाषा; उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाचा सुकलेली पानं असा उल्लेख, राजन साळवींची प्रतिक्रिया
Recover your password.
A password will be e-mailed to you.