तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

बाळ्यामामा म्हात्रे भावी खासदार, शरद पवार गटाची बॅनरबाजी, थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांना टक्कर?

0 36

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी नुकताच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर लावण्यात आले आहेत. यावर त्यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत शहरात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.

सध्या भिवंडीतून भाजपचे खासदार असलेले कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहेत. बाळ्यामामा हे त्यांचे कट्टर विरोधक. त्यामुळे पाटलांच्या विरोधात बाळ्या मामा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढत देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बाळ्या मामा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भिवंडी लोकसभेची राजकीय गणितं बदलण्याची दाट शक्यता आहे. खरं तर बाळ्यामामा पक्षांतरासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा पक्ष बदलले आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (शिंदे गट) असे एकूण सहा वेळा पक्ष बदलणाऱ्या बाळ्यामामांचे हे सातवे पक्षांतर. बाळ्यामामांचे पाचही प्रमुख पक्ष फिरुन झाले आहेत. त्यात शिवसेनेत तर तीनदा गेलेत. आता हा त्यांचा आठवा पक्षप्रवेश.

काय पो छे! पतंग अवघ्या २० सेकंदात कापली, अमित शाहांची तरुणाला भन्नाट रिअ‍ॅक्शन, व्हिडिओ समोर
याआधी, शिवसेनेतील फुटीनंतर म्हात्रेंनी राष्ट्रवादी सोडून शिंदे यांना साथ दिली होती. पण शिंदेंबरोबर राहिलं तर कपिल पाटलांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर येईल, असा त्यांचा विचार झाला. शिवाय लोकसभा लढवण्याची बाळ्यामामांची इच्छा लपून राहिलेली नाही.

भिवंडी लोकसभेमध्ये बाळ्या मामांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी स्वतः शरद पवार हे आग्रही होते.

KDMC मधील माजी नगरसेवक दाम्पत्याचा भाजपला रामराम, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर
सध्या हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आहे. त्यामुळे काँग्रेस हक्क सोडेल का? हा प्रश्न आहे. तसं झालं तर बाळ्यामामा कपिल पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतात किंवा काँग्रेसचा उमेदवार जरी असला तरी त्याला बाळ्यामामांची ताकद पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी असेल, अशी चर्चा भिवंडीत रंगू लागली आहे.

शिवसेना ज्यांच्यामुळे दिग्गजांनी सोडली, त्यांच्याच हातून पक्ष सुटला, शर्मिला ठाकरेंचा टोला
पवारांनी टाकलेले फासे जर त्यांच्या नियोजनाप्रमाणे पडले तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांचा आणि भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होऊ शकतो याचीही चर्चा रंगू लागली आहे.

नगरसेवक उभा करायला काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल; राजकारणावर जयंत पाटील स्पष्टच बोलले

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.