
Tej Police Times
कारसेवकांच्या आठवणींना फडणवीस यांनी यावेळी उजळा दिला. ‘६ डिसेंबर १९९२ रोजी सकाळी सर्व कारसेवक एकत्र जमले. कलंकाचा ढाचा खाली येणार, असा निर्धार करूनच सर्व एकवटले होते. ढाचा खाली आला आणि मंदिरही तयार झाले. ‘रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे…’ अशी घोषणा देण्यात येत होती, ती आता खरी करून दाखविली. आता अयोध्येत भव्य मंदिर तयार झाले आहे.’
बाबरी मशिद पाडली तेव्हा रामलल्लांची मूर्ती कोठे होती? पुणेकर जोशींचं काय योगदान? जाणून घ्या
अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर फडणवीस यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. २००७मध्ये काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. ‘राम काल्पनिक आहे, रामसेतू अस्तित्वातच नाही’, असे त्यांचे म्हणणे होते, असे सांगत, ‘जो राम का नही, वह किसी का नही’… अशी घोषणाही फडणवीस यांनी यावेळी दिली. २२ जानेवारीनंतर सर्वांनी अयोध्येला जाऊन दर्शन घ्यायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जागो तो एक बार हिंदू जागो रे…
प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांनी ‘बोलो जय जय सियाराम’, ‘अयोध्या आये मेरे राम’, ‘शिव शिव शिव शिव शंभो’, ‘लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा… शिव भोला भंडारी…’, ‘मंगल भवन अमंगल हारी…’ यांसारखी गीते गाऊन वातावरण भक्तिरस भरला. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत नागरिकांनीही परिसर दुमदुमून सोडला. वातावरणात उत्साह भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही ‘जागो तो एक बार हिंदू जागो रे’… हे गीत सादर केले. उपस्थितांकडून या गीतांना उत्स्फूर्द दाद मिळाली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.