
Tej Police Times
शशिकांत शिंदे म्हणाले, कारसेवक असल्याचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे. बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हते. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवले. शिवसेनेने घटनेची जबाबदारी घेतल्याचे व त्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे जाहीर केले. आज मात्र सर्वजण याचे श्रेय घेत आहेत.
वेध लोकसभा निवडणुकीचा : यंदा शेकापचं टॉनिक नाही, तटकरेंचा कस लागणार, गीते पुन्हा मैदानात, रायगडमध्ये काय होईल?
शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार करावा. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल.सरकारने समाजात तेढ वाढू नये, यासाठी प्रयत्न करावे आणि आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार हे स्पष्ट करावे, असंही ते म्हणाले.
मुंबईला आंदोलनकर्ते आले, तर मुंबई आणि पर्यायाने देश ठप्प होईल. देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणूक होईल हेही सांगता येणार नाही.
भारत जोडो न्याय यात्रेच्या बसजवळ जमाव जमला, मोदींच्या घोषणा, राहुल गांधींची खास रिअॅक्शन,आसाममध्ये काय घडलं?
भाजपाने इतर पक्षातील मातब्बर नेते घेतले तरीही ईडीच्या धाडी विरोधकांच्या घरी पडत आहेत. हीच का लोकप्रियता? असा सवाल त्यांनी केला.
लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा होत असल्याचा आनंद आहे. पण माझ्या उमेदवारीबाबत सध्या तरी बोलणार नाही. कारण मी बोललो की बाकीचे सावध होतात, असा सावध पवित्रा घेतला, शशिकांत शिंदे यांनी घेतला.
लोकशाही टिकण्यासाठी पहिजे ती किंमत आम्ही मोजू, कितीही अडचणी आल्या तरी एकत्र राहावं लागेल : शरद पवार
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.