Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलिसांनी घरी आणून सोडल्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; आईचा गंभीर आरोप

15

हायलाइट्स:

  • युवकाने गळफास लावून घेत केली आत्महत्या
  • आईने पोलिसांवरच केले गंभीर आरोप
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण झालं शांत

अहमदनगर : चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित म्हणून चौकशी करून सोडलेल्या युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे ही घटना घडली. आदित्य अरुण भोंगळे (वय २०) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी सदर तरुणाने मोबाईलवरून कोणाला तरी पैसे पाठवल्याचं सांगण्यात येत असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झालं.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद चिघळला; गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचलं प्रकरण

यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी या भागात दुचाकी चोरी आणि शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात काही आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामध्येच आदित्य भोंगळे याचीही चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर काही काळाने त्याला घरी आणून सोडले. त्यावेळी आदित्य अतिशय भयभीत झालेला होता. त्याने त्याचा आईला पोलिसांनी आपल्याला मारल्याचं सांगितलं होतं.

आदित्यने आईकडून बचत गटाचे ५० हजार रुपये घेऊन मोबाईलवरुन हे पैसे कोणाला तरी पाठवले होते. पोलीस पुन्हा येणार आहेत, असं त्याला कोणीतरी सांगितल्याने तो अधिकच घाबरलेला होता. मंगळवारी सायंकाळी आईला मी मित्राकडे जाऊन येतो, असं सांगून तो बाहेर पडला. बराच वेळ झाल्यानंतर त्याची आई त्याला शोधण्यासाठी बाहेर पडली. त्यावेळी घराच्या बाजूला बांधकाम सुरु असलेल्या घरात आदित्य गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तरुणाच्या आत्महत्येला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना तालुका प्रमुख ऍड. अविनाश मगरे, माजी सभापती प्रकाशबापू भोसले, नगरसेवक कैलास तिजोरे, बाळासाहेब गायकवाड, पवन साळवे, विनय बोरुडे, भाऊ भोंगळे यांनी पोलिसांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी चौकशीचं आश्वासन दिलं. आईची फिर्याद घेतली जाईल, आपण स्वत: चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर नातेवाईकांनी त्या युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.