
Tej Police Times
सरकार आरक्षण देण्यामध्ये प्रामाणिक राहिले पाहिजे. आरक्षणासाठी सरकारला तोडगा काढायचा असेल तर वेळ दिला पाहिजे. सर्व उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तोडगा लवकर निघेल, असं वाटतं नाही. आता सुद्धा जो डेटा मिळवला जात आहे तो चुकीच्या पद्धतीने मिळवला जात आहे. ज्यामध्ये अनेक त्रुटी आढळणार आहेत. उद्या जाऊन कोटाने म्हटलं हा डेटा मॅन्युप्लेटेड आहे, तर विचारात पडू नका, असे ते म्हणाले.
एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत
एक लक्षात घेतलं पाहिजे जर आरक्षण द्यायचं असतं तर याआधीच आरक्षण दिलं असतं. सत्तेवरची माणसं त्यावेळेस ही तेच होते, आता पण तेच आहे. त्यांना आरक्षण द्यायचं नाही. तुम्ही लाख काय १० लाख किंवा कोटी माणसं घेऊन गेली तरी. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझं सांगणं आहे की, शेवटची जी खिडकी आहे मराठा आरक्षणाची ती सरकारकडून बंद करून घेऊ नका. जरांगे पाटलांनी लक्षात घेतलं पाहिजे, आणा पाटलांपासून खेडेकरांपर्यंत आंदोलन लक्षात घेतली पाहिजे. ती निजामी मराठ्यांनी जिरवली आहे. तुमचं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर येणाऱ्या २०२४ या राजकीय दृष्टिकोनाने त्यांनी सरकारची भूमिका विचारली पाहिजे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.