
Tej Police Times
सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना झाले. या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकर आरंगळ आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वीय सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
काय आहेत मागण्या
– नोंदीत सापडणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावे
– कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलांना १०० टक्के मोफत शिक्षण द्या
– आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
– आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा
– जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
– SEBC अंतर्गत २०१४च्या नियुक्त्या त्वरित द्या
– वर्ग १ व २ आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या
Recover your password.
A password will be e-mailed to you.