
Tej Police Times
मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने या वर्षी मोठं नियोजन केलं आहे. तब्बल २२५ पेक्षा अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे गणेश भक्तांना कोकणात आणत आहे. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाचंही कोकण रेल्वेने नियोजन केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग करण्यात आलं आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह १२ जणांवर गुन्हा दाखल
आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसंच नोंद घेतली जात आहे. आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे नियंत्रण केलं जात आहे.
दरम्यान, आता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. ज्याच्याकडे आरक्षण नाही अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये, त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आरक्षण असलेल्या प्रवाशांनीही तपासणीसाठी आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित राहावं, असं आवाहन कोकण रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.