
Tej Police Times
दरम्यान सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा वीज जोडणी करून मिळत नसल्याने व्यवस्थित होऊन डाखोरे यांनी सदरचे प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नांदेडकडे दाखल केले होते. यासंदर्भात मंचाने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी निकाल दिला. त्या निकालात आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत वीज जोडणी करून द्यावी. मुदतीत वीज जोडणी करून न दिल्यास वीज कंपनी विलंबाच्या प्रती आठवड्याला शंभर रुपये अर्जदारास द्यावे, असे आदेश दिले होते. वीज जोडणीसाठी कोटेशन शुल्क भरून अकरा वर्षाचा कालावधी लोटला असताना वीज जोडणी देण्यात आली नाही. मात्र महावितरण कंपनीकडून त्यांना १ लाख ५८ हजार ६४४ रुपयाचे विद्युत बिल आकारण्यात आले आहे.
महावितरण विभागाच्या या कारभारावर डाखोरे दांम्पत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या जाहिराती करत आहे. दुसरीकडे पैसे भरून सुद्धा अकरा वर्ष वीज जोडणी दिल्या जात नाहीये. महावितरणाचा भोंगळ कारभार आणि शासनाची दुटप्पी भूमिका यात शेतकरी मात्र चांगलाच भरडला जात आहे. शेतात सिंचनाची सोय असून सुद्धा वीज जोडणी मिळत नसल्याने बागायत शेती करण्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्याकडे ही महावितरणाने लक्ष देऊन तातडीने वीज जोडण्या देण्याची मागणी होत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.