Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पाच वर्ष खासदार म्हणून तुम्ही काय केलं? साखर वाटप कार्यक्रमात विखेंवर प्रश्नांची सरबत्ती

8

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी काही काळ लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुमची दाळ-साखरेची भेट आम्हाला नको, शेतीला पाणी द्या, अशी मागणी लोक करीत होते. त्यावेळी खासदार विखे पाटील यांनी पाणी योजना मंजूर झाल्याचे सांगत विखे परिवारावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. ‘तुम्ही आमच्या परिवाराला किती वर्षांपासून ओळखता? आम्ही दिलेला शब्द पाळतो. हाही शब्द खरा करीत आहोत,’ असे सांगत विखे पाटील यांनी लोकांना आपल्या परिवाराची गॅरंटी दिल्यावर गोंधळ थांबला.

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने खासदार विखे पाटील यांच्याकडून मतदारसंघात प्रत्येक गावात दाळ-साखर वाटप सुरू आहे. बहुतांभ भागात वाटप करून झाले आहे, उरलेल्या गावात हे काम सुरूच आहे. पाथर्डी तालुक्यातील भालगावात विखे पाटील आणि आमदार राजळे यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कार्यक्रम सुरू असतानाच लोकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही कोणत्या योजना आणल्या ते सांगा, आमच्यासाठी काय काम केले ते सांगा. दाळ-साखर नको, आश्वासन दिल्याप्रमाणे शेतीला पाणी द्या, अशा मागण्या लोक करीत होते. एकाच वेळी आरडाओरड झाल्याने आणि त्यातच वीज गेलेली असल्याने मंचावरून बोलणेही अवघड झाले होते.

५ वर्ष MP म्हणून तुम्ही काय केलं?, साखर वाटप कार्यक्रम सुजय विखेंच्या अंगलट, कार्यक्रम सोडून गेले

शेवटी विखे पाटील यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आपले मुद्दे मांडण्यास सुरवात केली. ज्या योजनेबदद्ल लोक प्रश्न विचारीत होते. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडली होती. आम्ही अलीकडेच तिला मंजुरी मिळवून आणली आहे. त्यामुळे तुमची मागणी नक्की पूर्ण होईल. ज्यांना कोणाला यासंबंधी शंका असेल त्यांनी सोबत चला. वस्तुस्थिती दाखवून देतो. तुम्ही आमच्या विखे पाटील परिवाराला किती वर्षांपासून ओळखता? आम्ही दिलेला शब्द पाळतो, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
संपूर्ण मतदारसंघात विखे पाटील यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या स्वत:च्या खर्चाने हा उपक्रम सुरू आहे. सुरवातीला लोकांना ही सरकारी योजना वाटल्यानेही गोंधळ झाला होता. बहुतांश ठिकाणी कार्यक्रम सुरळीत झाले. काही गावांत मात्र लोकांनी प्रश्न उपस्थित केले.

मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही, एकाची जिरवली आता दुसऱ्याची जिरवायची, निलेश लंके यांच्या टार्गेटवर विखे!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.