
Tej Police Times
निवडणुका आल्यानंतर का होईना पण पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूचे सुटाबुटात बसलेले मंत्री आहेत, मित्र आहेत ते नाहीयेत तर तुमच्या पलीकडे सुद्धा हा देश आहे. त्याच्यामध्ये तरुण आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, व गरीब सुद्धा आहेत. दहा वर्षे झाली, आता दहा वर्षानंतर तुम्हाला या चार जाती आठवल्या का? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तुमच्यासोबतच अदानी वगैरे आहेत, तेवढा देश नाहीये की ज्याच्यासाठी तुम्ही देशाची दहा वर्षे खर्ची घातली. हे सुटाबुटातलं सरकार आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या, सरकार महिलांचा सन्मान करतंय, तर मग तुम्ही मणिपूरमध्ये का जात नाही? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला. मणिपूरमध्ये जाऊन त्या महिलांवरती अत्याचार झाले आहेत, त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं की आमच्या देशात महिला आहेत. आत्ता आम्हाला कळलं की निवडणुकीमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी काम करणार आहोत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही केली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.