
Tej Police Times
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात गेल्या ४० वर्षांपासून हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन मशिदीत गणपती बसवत आहेत. गावातील न्यू गणेश तरुण मंडळाने १९८१ साली पहिल्यांदा गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली. मात्र त्यावेळी जोरदार पावसाने मंडळाच्या मंडपाचं नुकसान झालं. यानंतर सर्वानुमते गणेशमूर्ती जवळच असलेल्या मशिदीत बसवली. तेव्हापासून आजतागायत गावातील हिंदू- मुस्लीम बांधव एकत्र येत मशिदीत गणपती बसवत आहेत.
coronavirus latest updates: पुन्हा चिंता वाढली! आज राज्यातील करोनाचा आलेख चढता; पाहा, ताजी स्थिती!
अनेकदा गणेश चतुर्थी आणि मोहरम पंजे एकत्र आले, तेव्हा मशिदीत एकाच मंडपात गणेशमूर्ती आणि पंजेही विराजमान झाले होते.
गेल्या ४० वर्षांपासून गणेश उत्सवामध्ये गावातील मुस्लीम बांधव मांसाहार करण्याचं टाळतात. यामुळे या गावात खऱ्या अर्थाने दोन्ही समाजामध्ये ऐक्याचे दर्शन घडत आहे. सध्या करोनाचा काळ असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे न्यू तरुण गणेश मंडळाचे सचिव राहुल कोकाटे यांनी सांगितलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.