
Tej Police Times
साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याची आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशावर भाजपनं सडकून टीका केली होती. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
‘महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कुठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व प्ररप्रांतीय लोक कुठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भाजपनं मुंबईत आंदोलन केलं. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत अशी ही भूमिका आहे, पण भाजपनं यावर आंदोलनं सुरू केले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
परप्रांतीय कोण?
‘मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे व भाषिकांचे नाव घेतले नाही. पण भाजपने हे परप्रांतीय उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत. मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्व जाती-धर्मांचे, प्रांताचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलगू लोकांच्या येथे मोठ्या वसाहती आहेत. माटुंगा- धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पडगा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत. मुंबईत तर बऱ्याच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढ्यापिढ्या मुंबई महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
‘मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व तेथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप परप्रांतीय प्रेमाचे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही,’ अशी टीका राऊतांनी केली आहे.
रोखठोक सदरातील महत्त्वाचे मुद्दे
Recover your password.
A password will be e-mailed to you.