तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

नरेंद्र मोदी घाबरलेत, स्टेजवर रडूही शकतात, कर्नाटकातील सभेत राहुल गांधी यांची टीका

0 30

वृत्तसंस्था, विजयपुरा (कर्नाटक) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून, ते स्टेजवर रडूही शकतात,’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लक्ष्य केले. कर्नाटकातील विजयपुरा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.‘तुम्ही मोदींची भाषणे ऐकली असतील. ते घाबरलेत. ते स्टेजवर रडू शकतात,’ असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभांतून काँग्रेस पक्षावर संपत्तीचे फेरवाटप, वारसा करासह विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान साधले. ‘वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. काही वेळा मोदी चीन आणि पाकिस्तानबद्दल बोलतात. काही वेळा ते तुम्हाला थाळ्या वाजवायला लावतात. काही वेळा ते तुम्हाला मोबाइलची टॉर्च लाइट लावायला सांगतात,’ असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले.
महायुतीतील धुसफुशीचा पुढचा अंक, मुंबईत भाजप उमेदवाराने अर्ज भरला, शिवसेना-राष्ट्रवादी गैरहजर

‘गरिबी, बेरोजगारी आणि महागाईसह भारतात सुमारे तीन ते चार कोटी समस्या आहेत. केवळ काँग्रेस पक्षच बेरोजगारी हटवू शकतो आणि महागाई कमी करून लोकांना त्यांचा हक्क देऊ शकतो,’ असेही राहुल गांधी म्हणाले.

‘मोदी केवळ गरीब लोकांकडून पैसे हिसकावून घेत आहेत. त्यांनी काही जणांना अब्जाधीश केले आहे. देशात २२ लोकांकडे सुमारे ७० कोटी लोकांकडे असलेल्या संपत्तीइतकी संपत्ती आहे. फक्त एक टक्का लोकांचे देशातील ४० टक्के संपत्तीवर नियंत्रण आहे,’ असेही गांधी म्हणाले. ‘सध्याच्या सरकारी योजनांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्यक आणि सर्वसाधारण वर्गातील गरिबांना स्थान नाही,’ असा दावाही त्यांनी केला.

‘मी तुम्हाला सोपी गोष्ट एका वाक्यात सांगतो. जी संपत्ती मोदी अब्जाधीशांना देत आहेत, तोच पैसा आम्ही देशातील गरीब लोकांना देणार आहोत,’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘अग्नीवीर’ रद्द करणार

सत्तेवर आल्यावर लष्कर भरतीची अग्नीवीर योजना रद्द करणार असल्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले. ‘वय वर्षे १८ ते २१मधील तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत घेणारी अग्नीवीर योजना लष्कर आणि जवानांचा अपमान असल्याचा आरोपीही त्यांनी केला. भारतातील तरुणांकडून मोदी यांनी लष्करातील नोकऱ्या हिसकावून घेतल्या आहेत. आम्ही अग्नीवीर योजना रद्द करू,’ असे राहुल गांधी म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.