
Tej Police Times
‘मोदी केवळ गरीब लोकांकडून पैसे हिसकावून घेत आहेत. त्यांनी काही जणांना अब्जाधीश केले आहे. देशात २२ लोकांकडे सुमारे ७० कोटी लोकांकडे असलेल्या संपत्तीइतकी संपत्ती आहे. फक्त एक टक्का लोकांचे देशातील ४० टक्के संपत्तीवर नियंत्रण आहे,’ असेही गांधी म्हणाले. ‘सध्याच्या सरकारी योजनांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्यक आणि सर्वसाधारण वर्गातील गरिबांना स्थान नाही,’ असा दावाही त्यांनी केला.
‘मी तुम्हाला सोपी गोष्ट एका वाक्यात सांगतो. जी संपत्ती मोदी अब्जाधीशांना देत आहेत, तोच पैसा आम्ही देशातील गरीब लोकांना देणार आहोत,’ असे राहुल गांधी म्हणाले.
सत्तेवर आल्यावर लष्कर भरतीची अग्नीवीर योजना रद्द करणार असल्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले. ‘वय वर्षे १८ ते २१मधील तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत घेणारी अग्नीवीर योजना लष्कर आणि जवानांचा अपमान असल्याचा आरोपीही त्यांनी केला. भारतातील तरुणांकडून मोदी यांनी लष्करातील नोकऱ्या हिसकावून घेतल्या आहेत. आम्ही अग्नीवीर योजना रद्द करू,’ असे राहुल गांधी म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.