
Tej Police Times
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान अंदाज विभागाने दिला आहे. राज्यातील कोल्लम, पलक्कड आणि थ्रिसूर या जिल्ह्यांमध्ये काळजी घेण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पलक्कडमध्ये ४१; तर कोल्लम आणि थ्रिसूर येथे ४० अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
कलबुर्गी : केंद्र सरकारकडून तीन हजार ४९९ कोटींचा दुष्काळ निधी कर्नाटकसाठी मंजूर झाला आहे. यातील तीन हजार ४५४ कोटी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांनी दिली. उर्वरित रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे आभार मानले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.